‘आईचं घर उन्हाचं’, ‘घर तिघांचं हवं’, ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संपदा जोगळेकर- कुलकर्णी. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबच त्यांनी लेखन, निवेदन आणि नृत्य या क्षेत्रांमध्येही आपला ठसा उमटविला आहे. सतत स्वत:ला कार्यरत ठेवणाऱ्या आणि प्रत्येक नवीन गोष्ट आवडीने शिकणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्रीने नुकतीच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. या मुलाखतीत बोलत असताना संपदा जोगळेकर यांनी शेतीविषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. विशेष म्हणजे त्यांच्या या संवादातून त्यांचं शेतीवर असलेलं अतोनात प्रेम यावेळी पाहायला मिळालं. तसंच त्यांनी समाजात घडणाऱ्या अनेक घटानांवरही त्यांचं मत व्यक्त केलं.