'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायलीने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकताच तिचा 'मन फकीरा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत असलेल्या सायलीला एका गोष्टीची कायम खंत वाटत असल्याचं लोकसत्ता 'डिजिटल अड्डा'मध्ये सांगितलं. मालिकांपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या सायलीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. मात्र सायलीला कधीही नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ही खंत कायम सतावत राहिलं असं सायलीने 'लोकसत्ता ऑनलाइन'शी बोलताना सांगितलं.