बिग बझारतर्फे आयोजित ‘एफबीबी फेमिना मिस इंडिया २०१५’  स्पर्धेच्या नागपूर शहर चाचणी फेरीतील विजेत्या स्नेहल पांडे, मयुरी नंदनवार व धृती पटेल यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या स्पर्धेच्या निवडीसाठी १८ शहरांमध्ये चाचणी फेऱ्या होत आहेत. नागपूर फेरीत निवड झालेल्या या युवती दिल्ली येथे होणऱ्या विभागीय चाचणी फेरीत भाग घेणार आहेत. अंतिम चाचणी फेरी मुंबईत होणार आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आहार, संवाद कौशल्य व सामान्य ज्ञान वाढविणे आवश्यक असल्याचे मत विजेत्या युवतींनी व्यक्त केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या उमेदवारांना व तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी विजेत्यांचा गौरव करण्यात आल्याचे बिग बझार स्टोअरचे व्यवस्थापक नीरज कुमार यावेळी बोलताना म्हणाले.