बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी बिग बी क्रिकेटपटूंच्या मुलींमुळे चर्चेत आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलींची एक यादी ट्विट केली आहे. मात्र ही यादी पाहून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी घराणेशाहीचे आरोप करत बिग बींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. T 3782 - An input from Ef laksh ~ ". and Dhoni also has daughter .. will she be Captain ? '' pic.twitter.com/KubpvdOzjt — Amitabh Bachchan (@SrBachchan) January 13, 2021 क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. त्यामुळे बिग बींनी आपल्या अनोख्या शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या मुलींची एक यादी ट्विट केली. ही आहे महिलांची टीम असं म्हणत त्यांनी महेंद्र सिंह धोनीच्या मुलीला त्या टीमचा कर्णधार म्हणून घोषीत केलं. मात्र गंमत म्हणून केलेलं हे ट्विट पाहून काही नेटकरी संतापले आहेत. "अमिताभ तुम्ही इथे देखील घराणेशाही चालवणार का?, क्रिकेटला तरी घराणेशाहीपासून दूर ठेवा." अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल केलं जात आहे. You want have nepotism even in cricket? This sports where only talents speaks unlike bully wood (bollywood) — Arindam Roy (@arin_roy1) January 13, 2021 When a army officers son/daughter joins army, will that be nepotism toomoron don’t be male kangna Ranaut — prerana zagade (@PreranaZagade) January 13, 2021 cricket me bhi nepotism laaa dijiye @SrBachchan jii.. — rupendra singh (@singh_rupendra) January 13, 2021 महानालायक जी की नालायकी का 1और सबूत। यहां पर भी नेपोटिस्म की ही बात कर रहे हैं। पर महानालायक जी, ज़रूरी नही जिस तरह से बॉलीवुड के बच्चे मानसिक रूप से कमज़ोर और नालायक होते हैं वैसे ही बाक़ियों के बच्चे भी कमज़ोर और नालायक हों। और इंटेलीजेंटइंसान कहीं भी अपना लोहा मनवा सकता है। — Always Right (@AlwaysR65922829) January 13, 2021 दरम्यान, अमिताभ महिला संघाच्या भविष्याबाबत बोलत असले तरी सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंची परिस्थिती बिकट आहे. भारताने मालिकेच्या सुरूवातीला दोन-तीन खेळाडूंना दुखापतीमुळे संघाबाहेर केल असताना आता चौथ्या कसोटीआधी सहा ते सात खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या कसोटीत भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसोबत मैदानात उतरतो हे पाहणे औत्स्युक्याचं असणार आहे.