मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नुकतीच मुक्ताने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान तिने ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाचे केवळ पाच प्रयोग का केले हे सांगितले आहे.

हे नाटक त्यावेळी हाऊसफूल होते. पण नाटकाचे केवळ पाच प्रयोग झाले होते. नाटकाचे पाचच प्रयोग का झाले असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता मुक्ता बर्वेने त्यामागचे कारण सांगितले आहे.