बॉलीवूडची ‘पंगा’ गर्ल कंगना रणौत तिच्या चित्रपटांच्या व्यतिरिक्त आणखी इतर मुद्द्यांसाठी कायम चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून ती कायदेविषयक बाबींमुळे चर्चेत येते आहे. कंगना रनौतच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. गीतकार जावेद अख्तरने कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, अंधेरीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंगना रनौत यांना न्यायालयात हजर होण्याची शेवटची संधी दिली आहे. पुढील सुनावणीसाठी अभिनेत्री हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केला जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले. कंगनाच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, कंगना देशात नसल्यामुळे मंगळवारी (२७ जुलै) सुनावणी दरम्यान ती हजर राहणार नाही. जावेद अख्तर यांच्या बाजूने वकिल जय भारद्वाज यांनी या सूटला विरोध दर्शविला व कंगना कोणत्याही तारखेला हजर न झाल्याने जामीनपत्र वॉरंट देण्याची मागणी केली. दरम्यान, कोर्टाने कंगनाला इशारा दिला आहे. A Mumbai Court grants exemption to #KanganaRanaut from appearance in the Magistrate Court Andheri only for today in light of the existing SOP.@Javedakhtarjadu pic.twitter.com/Y0pUdx8AY9 — Bar & Bench (@barandbench) July 27, 2021 यापूर्वी देखील जारी झाला होता वॉरंट जावेद अख्तरने कंगना राणौत यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. परंतु कंगनाच्या कोर्टात हजर झाल्याच्या संदर्भात अनेकदा अनियमितता दिसून येत आहे. यापूर्वीही त्यांच्याविरूद्ध वॉरंट देण्यात आले आहेत. कोर्टाने वारंवार बोलावले तरी न आल्यामुळे कंगनाला वॉरंट बजावले होते. राज कुंद्राच्या अटकेनंतर कंगनाची बॉलिवूडबद्दल संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली… काय आहे प्रकरण? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. यावरून गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने १ मार्च रोजी कंगनाला वॉरंट जारी केला होता. मात्र हा खटला अजुनही प्रलंबित आहे. कंगना सध्या तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या शूटिंगसाठी बुडापोस्टला पोहोचली आहे. २८ जून रोजी पासपोर्ट नुतनीकरणाच्या सुनावणी दरम्यान कंगनाने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे खटले प्रलंबित नाहीत, असं सांगितलं होतं. पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणामुळे तिला ‘धाकड’च्या शूटिंगसाठी पोहोचण्यात उशिर झाला. या चित्रपटातील इतर क्रू मेंबर्स खूप दिवस आधीच पोहोचले होते. सध्या कंगना तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.