भाजपाचं सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात असे. आता सर्वांना समान न्याय मिळतो. २०१७ पूर्वी फक्त जे ‘अब्बा जान’ म्हणत होते, तेच रेशन संपवत होते असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. नेहमी परखडपणे आलं मत मांडणारे बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाराजी जाहीर केली असून टीका केली आहे.

“काँग्रेस दहशतवादाची जननी असून नेहरुंचा…”; योगी आदित्यनाथ यांची टीका

योगी आदित्यनाथ यांचं हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. “उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं ‘अब्बा जान’चं वक्तव्य अपमानास्पद असून त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं देखील नाही,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत.

“एकेकाळी गुंड, माफिया युपीचं शासन-प्रशासन चालवायचे, आज ते…”; मोदींचा विरोधकांवर निशाणा तर योगींचं कौतुक

“ही व्यक्ती (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री) जी आहे ते आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांचं हे ‘अब्बा जान’ वक्तव्य द्वेषयुक्त वक्तव्यांचा भाग आहे जे ते आधीपासून बोलत होते,” अशी टीका नसीरुद्दीन शाह यांनी केली आहे.

योगी आदित्यनाथांनी काय म्हटलं –

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (रविवार) कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टी (सपा)वर निशाणा साधला आणि आरोप केला की, “समाजवादी पार्टीचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. २०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का मिळत नव्हते? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होतं. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल”.

तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी झापलं, म्हणाले…

दरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना झापलं होतं. ‘तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवणे ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानने ताबा मिळवल्याने काही भारतीय मुस्लीम आनंदी होत आहेत हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे,’ असे नसीरुद्दीन शाह म्हणाले होते.

पुढे ते म्हणाले होते की, ‘भारतीय इस्लाम हा जगभरातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे आणि देवाने ती वेळ आणायला नको जिथे ते खूप बदलतील आणि आपण त्याला ओळखूही शकणार नाही. आज भारतीय मुस्लिमांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की, इस्लामला सुधारणा आणि आधुनिकतेची गरज आहे की जुन्या काळात सुरु असलेली क्रुरतेची? मी हिंदुस्तानी मुस्लीम आहे आणि मिर्झा गालिब यांनी खूप आधी म्हटल्याप्रमाणे, माझा देवाशी संबंध हा अनौपचारिक आहे. मला राजकीय धर्माची गरज नाही.’