सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर हे त्यांच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी कठिण काळात होणाऱ्या गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार असे म्हणत केलेल्या ट्वीटला उत्तर दिले होते. अनुपम खेर यांनी उत्तर देत 'घाबरु नका. येणार तर मोदीच' असे म्हटले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. अनुपम खेर यांनी ट्वीटमध्ये शेखर यांना उत्तर देत म्हटले होते की, 'आदरणीय शेखर गुप्ताजी. हे जरा जास्तच झालं. तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. करोनाही एक आपत्ती आहे. संपूर्ण जगासाठी. आपण या माहामारीचा या पूर्वी कधीही सामना केला नव्हता. सरकारवर टीका करणे गरेजेचे आहे. पण करोनाचा सामना करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. घाबरु नका. येणार तर मोदीच.' अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे समर्थन केलेले पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. एका नेटकऱ्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन यांच्या फोटोवर 'कलंक आहेस तू कलंक' असे म्हटले आहे. Meanwhile Indians to Anupam Kher pic.twitter.com/CvJhJ83U3y — Aditya Srivastava (@adi_shriwas) April 25, 2021 तर दुसऱ्या एका यूजरने 'वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे दररोज हजारो लोक भारतात मरत असताना अनुपम खेर यांनी आज येणार तर मोदीच असे म्हटले. त्या पेक्षा कलाकारांनी न बोललेलं बरं' असे म्हटले आहे. Anupam Kher's today tweeted saying "Aayega to Modi hi" at the time when thousands are dying in India every day due to lack of medical facilities. It's better that our spineless celebs remain silent only. — Nimo Tai 2.0 (@Cryptic_Miind) April 25, 2021 That's it. Boycotting all your movies. While it doesn't impact you much, you'll not be able to sleep knowing you support a murderer and this is just to remind you everyday. Sad state of affairs. When your house will burn, you'll know. — Uchit Solanki (@uchitsolanki) April 26, 2021 Everyone knows that you are one of the beneficiaries of being appointed RS member by Modi Govt, think of so many deaths taken place, think of their families who lost dear ones due to lack of oxygen, the callousness of Modi in dealing with human tragedy — rajennair (@rajennair) April 26, 2021 काय म्हणाले होते शेखर गुप्ता? 'मी नैसर्गिक आपत्ती, युद्ध, अन्नटंचाई अशा अनेक परिस्थिती पाहिल्या आहेत. पण पाळणीनंतर आलेले हे सर्वात मोठे संकट आहे आणि भारताने यापूर्वी कधीही असं अकार्यक्षम सरकार पाहिलं नव्हतं. कोणतेही नियंत्रण कक्ष नाही, कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. हा प्रशासनाचा आभाव आहे' या आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.