टेलिव्हिजनवरील 'होणार सून मी ह्या घरची' या लोकप्रिय मालिकेतील श्री आणि जान्हवीची प्रसिद्ध जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यात एकमेकांपासून विलग होण्याच्या तयारीत आहे. शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान या दोघांनीही एकमेकांशी घटफोस्टाचा निर्णय घेतल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे सध्या मालिकेमध्येही श्री आणि जान्हवीचे नाते तुटण्याच्या सीमेवर आहे. श्री-जान्हवीची जोडी मराठी मालिकांच्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र, प्रत्यक्ष जीवनातही दोघांच्या नाट्यात कटुता आल्याने या मालिकेच्या प्रेक्षकवर्गाला चांगलाच धक्का बसला आहे. याचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. शिवाय मध्यंतरी याबाबत दोघेही बोलते झाले होते. ''असं काही नाही,'' असंही ते म्हणाले होते; पण चित्र फारसं बदललेलं दिसत नाही. काही दिवसांपूर्वी पटत नसल्यामुळेच दोघे वेगवेगळे राहत असल्याची बातमी कानावर पडली होती. घडलंय-बिघडलंय : पडद्यामागेही तेच..?शशांकने पुण्याच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात शशांक आणि तेजश्रीचा विवाह झाला होता. परंतु, वर्षभरातच दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा इंडस्ट्रीत होती. मात्र मालिकेतील कथानकही त्याच वळणावर असल्यामुळे सुरूवातीला हा स्टंट असावा असे प्रेक्षकांना वाटले होते. मात्र, आता मालिकेतील वाद घराच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपल्याचे स्पष्ट झाले आहे. विवाह पुण्यात झाल्यामुळे घटस्फोटासाठीचा अर्ज पुण्यातील न्यायालयात दाखल झाला आहे. शशांकने घटस्फोटाची मागणी करताना व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातील प्रसंगांचे दाखले दिले आहेत.