बिग बॉस पर्व १३मधील स्पर्धक पारस छाबडाची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी ही कायम चर्चेत असते. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. नुकताच आकांक्षाने पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी पावसामध्ये तुंबणाऱ्या मुंबईकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. आकांक्षाने ट्विटमध्ये मी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करते की त्यांनी मुंबईत पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यावर काही तरी उपाय करावा असे म्हटले आहे. त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केले आहे. which causes massive destruction in the city, especially to the poverty stricken citizen's of our nation. I trust my Prime Minister and the government of my country that my request will surely be taken into consideration. Jai Hind. Part 2#IndependenceDay #Independence #JaiHind — Akanksha Puri (@akanksha800) August 14, 2020 दरवर्षी मुंबईत निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे शहरांचे मोठे नुकसान होते. खासकरुन गरीब लोकांना याचा मोठा फटका बसतो. मला विश्वास आहे की पंतप्रधान आणि माझ्या देशातील सरकार माझ्या या विनंतीवर नक्की विचार करतील या आशयाचे तिने दुसरे ट्विट केले आहे. तिच्या या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. आकांक्षा पुरी सध्या छोट्या पडद्यावरील मालिका 'विघ्नहर्ता गणेश' या मालिकेत भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत तिच्यासोबत बसंत भट्ट, उजैर बसर, मलखान सिंह आणि इतर कलाकार भूमिका साकारताना दिसत आहेत. याच मालिकेत पारस छाबडाने रावण ही भूमिका साकारली होती.