‘मेरी आशिकी तुमसे ही’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता अखेर २३ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकले. या दोघांचे नातेवाईक आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकार मंडळी या लग्नाला उपस्थित होते. तसेच, बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झादेखील या पाहुण्यांमध्ये होती.

वाचा : अनुष्का-साक्षी धोनीमधील कनेक्शन माहितीये का?

स्मृती आणि गौतम यांनी काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा केला. आपले आवडते कलाकार खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याची बातमी ‘मेरी आशिकी…’च्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता. मालिकेत हे दोघे प्रेमीयुगुलांच्या भूमिकेत दिसले. मात्र, त्यावेळी त्यांच्यात केवळ मैत्रीचे नाते होते. मालिका संपल्यानंतर दोघांमधील भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गौतमने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये स्मृतीला लग्नाची मागणी घातली होती.

वाचा : आवडीची सरकारी नोकरी निवडण्याची ‘मिस वर्ल्ड’ला ऑफर

लग्नासाठी उत्सुक असलेल्या स्मृतीने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली होती. ती म्हणाली की, आमच्या नव्या आयुष्याची मी आतुरतेने वाट पाहते. लग्नादिवशी स्मृती गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये जणू एखाद्या राणीसारखी दिसत होती.

https://www.instagram.com/p/Bb1O1WPAf-g/

https://www.instagram.com/p/Bb1yN37BTBg/

https://www.instagram.com/p/Bb1yuMflHqb/

https://www.instagram.com/p/Bb1QIYrgkUU/

https://www.instagram.com/p/Bb3RmckAjwO/