‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. करोनाबाधित झाल्यानंतर त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. गेल्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पत्नी उमा ताम्हाणे यांचेही १९ एप्रिलला करोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांचे कु टुंब असा परिवार आहे. नाटककार-अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते भाऊ होत.

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकाचे लेखन-निर्मिती शेखर यांनी केली होती. त्यांचे ‘तू फक्त हो म्हण’ हे नाटकही गाजले होते. ‘तिन्ही सांज’ हे नाटक अलीकडेच प्रदर्शित झाले होते, यात काही वेगळे तंत्रप्रयोगही त्यांनी केले होते.

pooja sawant and siddhesh chavan performed satyanarayan pooja
लग्नानंतर पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण यांनी जोडीने केली सत्यनारायण पूजा! बहिणीने शेअर केला खास फोटो
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या