दिवसरात्र शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं महत्त्व हे शब्दामध्ये व्यक्त करणं कठीण आहे. कोणताही ऋतू, हवामान, परिस्थिती यांचा विचार न करता ते अहोरात्र शेतात राबत असतात. याच शेतकऱ्यांविषयी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने भाष्य केलं असून शेतकरी आहेत, म्हणूनच आपण आहोत असं तिने म्हटलं आहे. लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये प्राजक्ता अनेक मुद्द्यांवर व्यक्त झाली. तसंच पोलिसांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी तिला वाटणारा आदरदेखील तिने या मुलाखतीत व्यक्त केला.