गोळी, बिरणायी आणि दहशतवाद याशिवाय भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही का? असा सवाल अभिनेता प्रकाश राज यांनी मोदी सरकारला विचारला आहे. प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियाव्दारे मोदी सरकारच्या वादग्रस्त निर्णयांवर प्रतिक्रिया देताना दिसतात. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले प्रकाश राज? "दिल्ली निवडणूक, गोळी, बिरणायी, दहशतवाद, आणि व्देष पसरवणारी भाषणे. भाजपाकडे सांगण्यासाठी या व्यतिरीक्त दुसरं काहीच नाही का? भाजपा तुम्हाला लाज वाटायला हवी." अशा आशयाचे ट्विट करुन प्रकाश राज यांनी भाजपावर टीका केली आहे. DELHI ELECTIONS. @BJP4India GOLI..BIRIYANI..TERRORISTS.HATE SPEECH.. don’t you have anything else to talk about #justasking SHAME ON YOU — Prakash Raj (@prakashraaj) February 4, 2020 प्रकाश राज यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या दिल्या आहेत. काही भाजप समर्थकांनी त्यांच्या या ट्विटचा निषेध केला. तर विरोधकांनी त्यांना आपल्या पाठिंबा दर्शवला.