बॉलिवूडची देसी गर्ल आणि तिचा विदेशी नवरा निक जोनास यांच्या लग्नाला काल दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ते दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. पण प्रियांकाने जर तिची चूक मान्य केली नसती तर आज हे दोघ सोबत नसते याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. प्रियांका आणि निक यांची जोडी ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. "माझे निकशी लग्न होईल असे मला कधी वाटले नव्हते. कारण तेव्हा मी निकला ओळखत नव्हते. त्याचा स्वभाव कसा आहे हे मला माहिती नव्हते. मी त्याच्याबद्दल जाणून न घेताच त्याच्या विषयी माझे मत तयार केले होते आणि हे फार चुकीचे होते. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती" असे प्रियांका म्हणाली. View this post on Instagram A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) पुठे ती म्हणाली, "मी एकदा सगळ्या मित्रांसोबत फिरायला गेली होती. मला तिथून एका मिटींगला जायच होत. पण माझी इच्छा होती की निकने मला थांबवले पाहिजे. त्यासाठी मी त्याला अनेक हिंट देखील दिल्या. त्यानंतर निक मला बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, तूला काय म्हणायचे आहे हे मला समजले आहे. पण मी तुला काम करण्यापासून कधीही थांबवणार नाही. कारण मला त्याचे महत्त्व माहित आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहेस याची मला कल्पना आहे. म्हणून मी तुला थांबवणार नाही." आणखी वाचा- प्रियांकाने सांगितलं बेडरूम सिक्रेट, म्हणाली “निक रोज सकाळी..” पुढे प्रियांका म्हणाली की "पहिल्यांदा कोणी तरी माझ्या कामाविषयी असे बोलले होते. अशा प्रकारे निकने मला इंप्रेस केल." दरम्यान, प्रियांकासोबत तीन वेळा डेटवर गेल्यानंतर निकने प्रियांकाला लग्नासाठी प्रपोज केलं. १ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका आणि निक यांनी जोधपुरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये शाही पद्धतीत लग्न केलं. प्रियांका आणि निक दोघे एकमेकांच्या संस्कृतीला जपण्याचा नेहमीच प्रयत्न करतात आणि प्रत्येक कार्यक्रमात सह कुटूंब यात शामिल होतात.