अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा नवीन वाद पुन्हा एकदा समोर आला. सोशल मीडियावर स्टारकिड्सविरोधात मोहीम चालवली जात आहे. सुशांतचे चाहते घराणेशाहीविरोधात भाष्य करत आहेत. तर दुसरीकडे दिग्दर्शक राम गोपाल वर्माने करण जोहरला पाठिंबा दर्शविला आहे. करण जोहरवर ज्याप्रकारे आरोप केले जात आहेत, याचा अर्थ लोकांनी फिल्म इंडस्ट्रीला समजूनच घेतलं नाही, असं राम गोपाल वर्माने ट्विटरवर लिहिलंय. ते म्हणाले, "१२ वर्षे इंडस्ट्रीत राहिल्यानंतर, पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर जर सुशांत इंडस्ट्रीत एकटं वाटल्याने आत्महत्या करू शकतो. तर त्याच्याइतकंही यश संपादन करू न शकणाऱ्या १०० कलाकारांची आत्महत्याही योग्य ठरू शकते. जे काही झालं त्यासाठी करण जोहरवर आरोप करणं म्हणजे तुम्ही अजून फिल्म इंडस्ट्रीला नीट समजू शकले नाही. जरी करण जोहरला सुशांतशी काही समस्या होती असं समजलो तरी कोणासोबत काम करायचं आणि कोणासोबत नाही याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य करणला आहे." WITHOUT NEPOTISM SOCIETY WILL COLLAPSE BECAUSE NEPOTISM(FAMILIAL LOVE ) IS THE FUNDAMENTAL TENET OF A SOCIAL STRUCTURE..Like u shouldn’t love others wife more, u also shouldnt love others children more — Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 16, 2020 If Sushant after 12 yrs of fame and money took his life becos he was made to feel like an outsider then a 100 actors suicides per day will be justified who couldn’t reach anywhere near Sushant. If u can’t b happy with what u have u will never be happy with whatever u have.Period! — Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 16, 2020 Blaming @karanjohar for what happened is ridiculous and just shows lack of understanding of how film industry works ..Even assuming Karan had a problem with Sushant it’s his choice of who he wants to work with,like its any film makers choice about who they want to work with — Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 16, 2020 यापुढच्या ट्विटमध्ये घराणेशाहीचं समर्थन करत त्यांनी लिहिलं, "घराणेशाही नसेल तर समाजव्यवस्था ढासळेल कारण कुटुंबातील प्रेमच समाजाचा आधार आहे. ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्या पत्नीवर जास्त प्रेम करू शकत नाही आणि ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम नाही करू शकत." या ट्विटनंतरही राम गोपाल वर्मा ट्रोल झाले आहेत. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगना रणौत, प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केलं आहे.