शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा इम्तियाज अली दिग्दर्शित सिनेमाचे नाव आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमाचे नाव 'जब हॅरी मेट सेजल' असे आहे. पहिल्यांदा या सिनेमाचे नाव 'द रिंग' असेल असे वाटले होते. पण सलमानने जेव्हा या सिनेमाचे पहिले पोस्टर ट्विटरवर शेअर केले होते तेव्हा त्याने लिहिले होते की, 'प्रदर्शनाची तारीख मी सांगितली, सिनेमाचं नाव तुम्ही सांगा..' सिनेमाच्या टीमने काही दिवसांपूर्वी नाव सुचवण्यासाठी सर्वसामान्यांनाही सांगितले होते. पण आता या सिनेमाचं नाव निश्चित झाले आहे. या तारखेला विवाह बंधनात अडकणार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य 'या सिनेमाचे नाव रणबीरने सुचवलेले नाही, त्यामुळे जर तो ५००० रुपये मागायला आला तर त्याला ते मिळणार नाही,' असे ट्विट शाहरुखने केले होते. रणबीर आणि इम्तियाझ अली फार चांगले मित्र आहेत. त्यामुळे मैत्रीमध्ये त्याने हे नाव सुचवलं असेल असे म्हणायला हरकत नाही. नुकताच रणबीर आणि कतरिना त्यांचा आगामी सिनेमा 'जग्गा जासूस'च्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते. यावेळी स्वतः रणबीरने त्यानेच या सिनेमाचे नाव सुचवल्याचे मान्य केले. Gurugram Gangrape: नरेंद्र मोदींना टॅग करुन अरिजीत सिंगने विचारले, कसे रोखणार बलात्कार? रणबीर म्हणाला की, 'मी जरी या सिनेमाचे नाव सुचवले होते तरी मला बक्षिसाबद्दल काही माहित नव्हतं. शाहरुखने जेव्हा याबद्दल ट्विट केलं तेव्हाच मला कळलं.' या नावाच्या घोषणेनंतर अनेकजण शाहरुख आणि अनुष्काला सिनेमासाठी शुभेच्छा देत होते. शाहरुखच्या चाहत्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे. रितेश देशमुखने यासंदर्भात ट्विट करत म्हटले की, 'पहिला लूक आवडला आणि टायटलही. याचा ट्रेलरही आता लवकर येऊ दे.' याचे उत्तर देताना किंग खान म्हणाला की, 'सिनेमाच्या नावालाच एवढा वेळ लागला तर ट्रेलरबद्दल काय बोलतोयस.'