दीपिका आणि रणवीर हे दोघंही बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं आहे. या दोघांच्या लग्नाला आता दोन महिने उलटले. बायकोसाठी काय पण करणारा रणवीर लग्नानंतर दीपिकाच्या घरी रहायला आला आहे. त्यामुळे रणवीर घरजावाई झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

लग्नानंतर दीपिकाच्या घरी राहण्याचा निर्णय घेण्यामागचे कारणही रणवीरने सांगितले आहे. एका मुलाखतीत बोलताना रणवीर म्हणतो, ‘ कमिटमेंटपासून पळण्याचा कोणताही मार्ग नसल्याचे लहानपणापासून बघत आलेल्या विवाह सोहळ्यांवरुन कळून चुकले. दीपिकाने तिचा कम्फर्ट झोन सोडून आपल्यासोबत येणं मला आवडलं नाही. त्यामुळेच दीपिकाच्या घरी रहायला जाण्याचा निर्णय घेतला.

तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये रणवीरने दीपिकाला पहिले प्राधान्य देण्याचा प्रयत्नही केला असल्याचे सांगितले. रणवीर आणि दीपिका गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी दोघे पारंपरिक सिंधी आणि कोंकणी पद्धतीनं ते दोघंही विवाहबंधनात अडकले. ‘सिंबा’ च्या यशानंतर रणवीर सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘गली बॉय’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये रणवीरसह आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.