बिग बॉस हा रिअॅलिटी शो पहिल्या दिवसापासून वादात अडकला आहे. कधी स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसतात तर कधी स्पर्धक आणि सूत्रसंचालक यांच्यातच वाद होतात. आता सलमान खान आणि जुबैर खानचेच घ्या ना… जुबेरने कार्यक्रमादरम्यान एका महिला स्पर्धकाला अपशब्द वापरले होते. यावरुन सलमानने त्याची चांगलीच कानउघडणी केली होती. पण यानंतर जुबैरने सलमानवर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले होते.

हे प्रकरण कुठे शांत होतेय असं वाटत असताना जुबैरने पुन्हा हा वाद उरकून काढला आहे. गेल्या १५ वर्षांतील त्याच्यावर असलेले सर्व खटले तो पुन्हा सुरू करण्याची मागणी करणार असल्याचे त्याने म्हटले. एवढं कमी की काय त्याने सलमानला नामर्द म्हणून हिणवले. तो नामर्द असल्यानेच त्याचे आतापर्यंत लग्न झाले नाही, असे तो म्हणाला.

गेल्या आठवड्याभरापासून तो सलमान कोणकोणत्या खटल्यांत अडकला होता त्याची जुबैर माहिती मिळवत आहे. आपण सलमानविरूद्ध जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. मी सलमानला एवढा त्रास देईन की ,त्याची रात्रीची झोप उडेल. सलमान आणि कलर्स वाहिनीवाले मला चांगलेच घाबरले आहेत. मी सलमान काय आहे हे, अख्या जगाला दाखवणार आहे. त्याला जोवर तुरूंगात पाठवत नाही तोवर मी शांत बसणार नाही. सध्या मी मोकळाच असल्यामुळे माझे सर्व लक्ष मी त्याच्यावरच देणार आहे, असेही जुबैरने सांगितले.