बॉलिवूड स्टार संजय दत्तचा संजू बायोपिक येत्या २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात संजयच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का की, एक वेळ अशी होती की, जेव्हा संजय ऋषी यांना बेदम मारण्याचा विचार करत होता. याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे टीना मुनीम. संजयचं टीनावर अतोनात प्रेम होतं. संजय आणि टीना लहानपणीचे मित्र. दोघांनी १९८१ मध्ये आलेल्या सिनेमातही एकत्र काम केले होते. पण ऋषी आणि टीनाचे अफेअर असल्याचा संशय संजयला आला होता. या संशयामुळेच संजय त्याचा मित्र गुलशन ग्रोवरसोबत मिळून ऋषी यांना मारण्याचा प्लॅन करत होते.

sanju

संजू आणि गुलशन सर्व तयारीनीशी ऋषी यांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांची भेट नीतू सिंहशी झाली. तेव्हा नीतूने संजय आणि गुलशन यांना ऋषी यांचे टीनासोबत कोणतेही अफेअर नसल्याचे स्पष्ट केले. नीतूने सांगितल्यावरच संजूचा विश्वास बसला आणि त्यांनी ऋषीला मारण्याचा बेत रद्द केला.

sanju

एशियन टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गुलशन यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, ‘संजय आणि मी भावासारखे होतो. एक दिवस संजय मला म्हणाला की चिंटूला मारण्यासाठी आपल्याला त्याच्या घरी जायचे आहे. आम्ही त्याच्या घरी गेलोही होतो पण यात नीतूने आम्हाला समजावले आणि आम्ही तिथून निघून गेलो.’ याच प्रकरणाचा ऋषी यांनी त्याच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रातही उल्लेख केला आहे.