बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या सारा तिचा आगमी चित्रपट ‘कूली नंबर १’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन सारासोबत दिसणार आहे. सारा आणि वरुणला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. नुकताच एका शोमध्ये साराने रोहित शेट्टीला त्याच्या गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून घेण्यास विनंती केली आहे. त्यावर गोलमाल चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला देखील हसू येईल.

नुकताच बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेत्री सारा अली खानने झी टीव्ही वाहिनीवरील ‘मूव्ही मस्ती विथ मनिष पॉल’ या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान सारा आणि रोहितने शोमध्ये मस्ती केल्याचे पाहायला मिळते. मस्ती करत साराने तिच्या मनातील एक गोष्ट पटकन रोहितला बोलून दाखवली आहे. पण त्यावर रोहितने दिलेल्या उत्तराने प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट पसरली आहे.

आणखी वाचा : रोहित शेट्टीने घेतली नवी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटासाठी तुम्हाला कुणी अभिनेत्री मिळाली आहे का? असा प्रश्न साराने रोहित शेट्टीला विचारला. त्यावर रोहित शेट्टीने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल. जेव्हा कधी गोलमाल सीरिजचा पुढचा चित्रपट येईल तेव्हा मी तुलाच अभिनेत्री म्हणून घेईन असे रोहित म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून सारा आनंदी होते. मात्र त्यानंतर रोहितने लगेच दिलेल्या उत्तराने साराचा हिरमोड झाला आहे. रोहित मजेशीर अंदाजात म्हणतो ‘झी वाल्यांनी मध्ये मध्ये मस्ती आणि मजाक करण्यास सांगितले आहे.’ ते ऐकून शोचा सूत्रसंचालक मनिष पॉलला देखील हसू आनावर होते.

झी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर सारा आणि रोहित शेट्टीचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. ‘तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मूव्ही मस्ती शोमध्ये सारा आणि रोहित आले आहेत’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे सारिकाशी केले होते कमल हासनने लग्न

साराने रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात काम केले होते. भारतात या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगण यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळली. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर, सारा आणि अजय हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळाले. खास रोहित शेट्टीचा टच असलेल्या या चित्रपटात रणवीरच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले गेले होते.