बॉलीवूड किंग खान शाहरुखने चेन्नई पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. त्याने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा धनादेश सुपूर्द केलायं.
शाहरुखची निर्मिती कंपनी असलेल्या रेड चिलीज् एन्टरटेंमेन्ट आणि दिलवालेच्या टीमतर्फे एक कोटींची मदत करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना पत्र लिहलेय. याआदी दक्षिणात्य कलाकरांनी पूरग्रस्तांना मदत केली. यात सुपरस्टार रजनीकांत, त्यांचा जावई, अल्लू अर्जुन, महेश बाबू यांसह अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे.
चेन्नई आणि तामिळनाडूला पूराने झोडपले असून आतापर्यंत २४५ लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती तामिळनाडू सरकारने दिली आहे. या पूराचा तडाखा वाहतूक यंत्रणा आणि दूरध्वनी विभागालाही बसला.