आजवर या कलाविश्वात बरेच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. परंतु काही चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात आणि कायम त्यांच्या स्मरणात राहतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'कुछ कुछ होता है'. ९० च्या दशकात आलेल्या या चित्रपटाचं स्थान आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ आहे. नुकतीच या चित्रपटाने २० वर्ष पूर्ण केली. या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने मैत्री आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात असं तरुणाईला दाखवून दिलं होतं. यात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल या तिघांच्या मैत्रीची धम्माल दाखविण्या आली होती. त्यामुळे या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. View this post on Instagram MOST GLORIOUS TRIO EVER!!! | @iamsrk @kajol #rani | • • #shahrukhlover #shahrukhkhan #shahrukhkhanfans #kingkhan #kingofbollywood #shahrukhkhanclub #shahrukhkhan #shahrukh_khan #shahrukhlove #kingofindia #srk #srkfangirl #srkfan #kingsrk #srkajolove #srkajolworld #srkajolforever #srkajol #srkajoledits #srkajolfans #kajol #kajollove #kajolqueen #kajolandsrk #kajoldevgan #kajolqueenofbollywood #kajolfangirl #kajolfan #20yearsofkkhh A post shared by SRK!! (@shahrukhkhan__is_life) on Oct 16, 2018 at 8:58pm PDT कार्यक्रमावेळी शाहरुख, काजोल आणि राणी यांनी चित्रपटाच्या काही आठवणी जाग्या करत त्या चाहत्यांपुढे मांडल्या. विशेष म्हणजे या तिघांच मैत्री आजही तेवढीच घट्ट असल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमातील काजोल आणि शाहरुखचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काजोल शाहरुखच्या गालावर किस करताना दिसत आहे. यावेळी शाहरुखच्या गालावर लिपस्टिक लागल्यामुळे काजोल ती पुसताना दिसत आहे. त्यामुळे दाग अच्छे नही होते असा अविर्भाव तिच्या चेहऱ्यावर दिसून येत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, यावेळी जाह्नवी कपूर, ईशान खट्टर, करीना कपूर, ट्विंकल खन्ना, वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, नेहा धूपिया, अनन्या पांडे, तारा सुतारिया, श्वेता बच्चन, अभिषेक बच्चन या दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.