२६/११ व पुलवामासह देशात होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, असा खळबळजनक आरोप गायिका हार्डकौरने केला आहे. हार्डकौर एवढयावर थांबलेली नाही तिने शिवाजी महाराजांच्या मृत्यूलाही आरएसएसचं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.   इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने यासंदर्भात भलीमोठी पोस्टच लिहिली आहे. हार्डकौरच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

‘मुंबईवरील २६/११चा हल्ला, पुलवामा हल्ला यांसह देशात होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्यांना संघ जबाबदार आहे. गोडेसने गांधीजींची हत्या केल्यानंतर सरदार पटेलांनी तुमच्यावर बंदी आणली होती. तुम्हाला येथे काम करण्याची परवानगी नाही. भारताच्या निर्मितीनंतर अनेकांचा बळी या जातीयवादी पक्षाने घेतला,’ असं लिहित हार्डकौरने संघावर तोफ डागली आहे.

https://www.instagram.com/p/Byz0NSaAdol/

इतकंच नव्हे तर, ‘जागे व्हा, तुम्ही तुमच्या बहीणींवर, मुलींवर बलात्कार होण्याची वाट पाहात आहात का? की त्यांनी तुमच्यावर हल्ला करण्यासाठी तुम्ही थांबलेले आहात?,’ असा प्रश्न तिने या पोस्टमधून विचारला आहे. आक्षेपार्ह भाषेत तिने संघावर टीका केली आहे. याआधीच्या पोस्टमध्ये तिने हेमंत करकरे व गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोपही संघावर केला आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही गंभीर टीका केली आहे.

हार्डकौर ही रॅपर व हिप हॉप गायिका आहे. तिचं मूळ नाव तारन कौर धिल्लन असं आहे. ‘एक गिलासी दो गिलासी’ हे रॅप, ‘पैसा फेंक तमाशा देख’ हे तिचं गाणं प्रचंड गाजलं. यासोबतच तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.