एस एस राजमौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही प्रशंसा मिळवली. तिकीटबारीवर पहिला, समाजमाध्यमांवरील चर्चेत पहिला, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा डंका जगभर वाजविणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने गेल्या वर्षी ६०० कोटी रुपयांची कमाई करीत विक्रम नोंदविला. मात्र चित्रपट पाहून आल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न अजूनपर्यंत कायम आहे, तो म्हणजे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले? या विषयी सर्वांनी आपआपले तर्कवितर्क लावले. मात्र, तरीही कोणाला याचे उत्तर मिळाले नाही. सोशल मिडियावर तर या प्रश्नाने धुमाकूळ घातला. पण, या प्रश्नाचे खरे उत्तर देणार तरी कोण? साहजिकचं चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजमौली. धर्मा प्रॉडक्शनने राजमौली यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी बाहुबलीच्या चाहत्यांच्या मनात कित्येक दिवस घोंगावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेय. कटप्पाने बाहुबलीला का मारले? …. कारण, यासाठी पाहा हा व्हिडिओ.