सध्या छोट्या पडद्यावर चंद्र आहे साक्षीला ही मालिका चांगलीच गाजताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि ऋतुजा बागवे हे मुख्य भूमिकेत झळकले आहे. कमी कालावधीत ही मालिका लोकप्रिय झाली असून सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. लवकरच स्वाती आणि श्रीधर लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, या लग्नानंतर स्वातीचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे.

श्रीधरच्या नकळतपणे येण्यामुळे स्वातीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे. हळूहळू ती त्याच्यात गुंतू लागली आहे. विशेष म्हणजे श्रीधर योग्य माणूस नसल्याचं नन्नाने अनेक वेळा स्वातीला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वाती श्रीधरच्या प्रेमात आकंठ बुडाल्यामुळे तिला श्रीधरचा डाव लक्षात येत नाहीये. त्यातच आता श्रीधर आणि स्वातीचं लग्न होऊ घातलं आहे.

स्वाती आणि श्रीधरच्या घरात लग्नाची पूर्ण तयारी झाली असून लवकरच हे दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. मात्र, श्रीधर आणि स्वातीचं खरंच लग्न होईल का? आणि झालंच तर श्रीधरचं सत्य स्वातीसमोर येईल का? हे या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना चंद्र आहे साक्षीला ही मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.