बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घराता गळफास लावून आत्महत्या केली. यशाच्या शिखरावर असताना सुशांतने असे पाऊल का उचलले? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. वयाच्या ३४व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. आता सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचा फोन कोणाला केला होता हे समोर आले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतने छोट्या पडद्यावरील अभिनेता महेश शेट्टीला शेवटचा फोन केला होता. सुशांत आणि महेश खूप चांगेल मित्र होते. त्यांनी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये एकत्र काम केले होते. सुशांतने महेशच्या वाढदिवशी देखील त्या दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Happy birthday meri jaan.. @memaheshshetty

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

सुशांतने महेशसोबत छोट्या पडद्यावरील मालिका ‘किस देस मै है मेरा दिल’मध्ये एकत्र काम केले होते. एकता कपूरने तिच्या मालिकेत एकत्र काम करण्याची संधी त्या दोघांना दिली होती. त्यानंतर त्यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत पुन्हा एकत्र काम केले. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याला ‘पवित्र रिश्ता’ या एकता कपूरच्या मालिकेन ओळख निर्माण करुन दिली होती. त्यानंतर २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.