गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबतच प्रेक्षकांसाठीही हा भावूक क्षण आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे त्यांच्या मतदारसंघात असताना एका चिमुरडीने रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून त्यांना घरी येण्याचा आग्रह केला. हे पाहून तेसुद्धा नि:शब्द झाले.

फेसबुक पोस्टद्वारे अमोल कोल्हे यांनी हा प्रसंग सांगितला. ‘आज मतदारसंघात एक चिमुरडी भेटली. रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून सांगत होती आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला.. नाहीतर ते तुम्हाला पकडतील. मी नि:शब्द… कृतकृत्य!’

Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
The senior clerk of Ghati Hospital was caught by the anti corruption department team while taking Rs
घाटी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक तीन हजार घेताना “लाचलुचपत” च्या सापळ्यात
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर

डॉ. अमोल कोल्हेंसाठी या मालिकेचा प्रवास काळजाच्या कप्प्यात जपून ठेवण्याजोगा आहे. फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.