छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. काही दिवसांपासून दयाबेन पुन्हा एकदा मालिकेत परतणार अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अंजली भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने या मालिकेला निरोप दिला होता. तिच्या जागेवर अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. आता नेहा मेहता पुन्हा एकदा मालिकेत येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. एका मुलाखतीत सुनैनाने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच सुनैनाने ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या चर्चांवर पुर्णविराम लावला आहे. “जवळपास ८ महिने झाले आहेत. जेव्हापासून मला अंजलीची भूमिका मिळाली आहे, तेव्हापासून दुसरी अभिनेत्री माझ्या जागेवर येणार असल्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. मी माझ्या दृष्टिकोनातून ही भूमिका साकारणार हे मी आधीच सांगितलं होतं. एवढी वर्ष ती भूमिका कोणी कशी साकारली याचा मी विचार करणार नाही,” असे सुनैना म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

मालिकेत दुसरी अभिनेत्री भूमिका साकारणार या चर्चेमुळे सुनैना नाराज झाली होती. यावर ती म्हणाली, “मी नवीन अभिनेत्री नाही. याआधी मी बलन वाली बहू, अदालत आणि एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये काम केले आहे. तारक मेहता या मालिकेचा मी भाग झाले याचा मला आनंद आहे. मला वाटतं की कोणती भूमिका कशी साकारायची हे त्या कलाकारावर आहे. बाकीच्या गोष्टी या प्रेक्षकांनी ठरवायच्या आहेत की नवीन अंजली भाभीला बघायला त्यांना कसे वाटते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

“नेहा मेहता पुन्हा एकदा मालिकेत येणार का?” असा प्रश्न विचारता सुनैना म्हणाली, “मी गेल्या ८ महिन्यांपासून अंजली ही भूमिका साकारत आहे. जर नेहा मेहता मालिकेत परत यायचे असेल तर याचा निर्णय हा मालिकेचे निर्माता असित मोदीच घेऊ शकतील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने आता पर्यंत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. मात्र, यात सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष हे अजून ही दयाबेन मालिकेत पुन्हा एकदा एण्ट्री करणार का याकडे लागले आहे.