छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेल्या सुबोध भावेला आणि इशा निमकरची भूमिका साकारलेल्या गायत्री दातारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता या मालिकेचा शेवट कसा होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विक्रांतचा खरा चेहरा कळल्यावर इशा त्याला माफ करणार का आणि त्यानंतर विक्रांतचं काय होणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र या मालिकेचा शेवट थोडा वेगळा होणार असल्याचं समजतंय

इशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं विक्रांतला तिच्या बाबांकडून समजतं. हे कळल्यावर त्याला धक्काच बसतो. आपण केलेल्या कृत्यांमुळे अस्वस्थ होऊन विक्रांत आत्महत्येचं पाऊल उचलतो. मालिकेच्या शेवटच्या भागात विक्रांत आत्महत्या करणार असल्याचं कळतंय.

Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न
Ravindra Jadeja Teases chepauk Crowd by Going For Batting Before MS Dhoni
IPL 2024: चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, धोनी आधी फलंदाजीला उतरला अन्… VIDEO होतोय व्हायरल
Gharoghari Matichya Chuli and Sadhi Mansa new serial in top-10 on trp report
टीआरपीच्या शर्यतीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या नवीन मालिका कोणत्या स्थानावर? जाणून घ्या टॉप-१० मालिका

आणखी वाचा : ..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा

विक्रांतने आत्महत्या केल्यानंतर इशाचं काय होणार आणि मालिकेचा शेवट कसा होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या काही दिवसांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच कलाकारांनी फेअरवेल पार्टी केली होती.