बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय ही जोडी ‘देवदास’, ‘जोश’ यांसारख्या चित्रपटात दिसली. ही जोडी बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांत झळकली असती मात्र ‘चलते चलते’ सह शाहरूखसोबतच्या पाच चित्रपटातून ऐश्वर्याची त्यावेळी गच्छंती करण्यात आली.

‘चलते चलते’ हा शाहरूख- राणीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला दहा वर्षांहून अधिकचा काळ लोटला. या चित्रपटात सुरूवातीला ऐश्वर्या राय बच्चन प्रमुख भूमिकेत होती. चित्रपटाचं चित्रीकरणही ऐश्वर्यानं सुरू केलं होतं मात्र तडकाफडकी शाहरूखनं ऐश्वर्याला काढून राणीला महत्त्वाची भूमिका दिली. त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमानच्या अफेअरची चर्चा होती. सलमाननं मद्यपान करून ‘चलते चलते’च्या सेटवर धुमाकूळ घातला होता अशाही चर्चा त्यावेळी होत्या. या कारणामुळे वैतागून ऐश्वर्याला काढून राणी मुखर्जीला घेण्याचा निर्णय शाहरुखनं घेतला होता.

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘वीर झारा’, ‘कल हो ना हो’ आणि अन्य तीन चित्रपटात शाहरूख ऐश्वर्या एकत्र काम करणार होते मात्र त्यावेळी या पाचही चित्रपटातून ऐश्वर्याचं नाव वगळण्यात आलं. ‘देवदास’ चित्रपटानंतर १४ वर्षे ही जोडी चित्रपटात दिसली नाही. त्यानंतर करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात शाहरूख आणि ऐश्वर्या अगदी छोट्या भूमिकेत झळकले.