करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त गुरुवारी वाऱ्यासारखे पसरले. सुदैवाने अपघातात त्यांना काहीही न झाल्याचे ‘पीटीआय’ने म्हटले होते. गेल्या आठवड्यात कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटनाला बिग बी यांनी उपस्थिती लावली होती. शनिवारी सकाळी मुंबईला परतण्यासाठी ते विमानतळावर जात असताना ही घटना घडली. त्यांच्या मर्सिडीज गाडीचे मागचे चाक अचानक निखळल्याचे वृत्त होते. पण, अमिताभ यांनी नुकतेच केलेले ट्विट पाहता असे काही घडले नसल्याचे समजते. अमिताभ यांनी गुरुवारी रात्री त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून असा कोणताही अपघात झाला नसल्याचे म्हटले.

‘कोलकत्यात झालेल्या अपघातामध्ये माझे प्राण जरासाठी बचावल्याचे हितचिंतक आणि माध्यमांकडून मला कळले. पण हे वृत्त चुकीचे आहे. असा कोणताही अपघात झालेला नाही. मी सुखरुप आहे’, असे बिग बीनी ट्विटमध्ये म्हटले.

अमिताभ यांनी अपघाताचे वृत्त फेटाळले

..या कारणामुळे रणवीर-दीपिकामध्ये व्हायचे भांडण

चाहत्यांनी दिलेले ३० कोटी रुपये परत करणार कमल हसन

भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला ५ कोटींचे बक्षिस

अर्ध्या तासाच्या परफॉर्मन्ससाठी बॉलिवूड अभिनेत्रीला १२ कोटींची ऑफर?

‘रॅम्बो’ने फेटाळले लैंगिक शोषणाचे आरोप

‘पद्मावती’चे तिकीट काढण्यापूर्वी विमा काढा; फेसबुकवरून धमकी

Inside Photos : ..अशी होती आराध्याची बर्थडे पार्टी

‘त्याला प्रत्येक शोमध्ये एक मुलगी हवी असते’

Dhadak photos: बॉलिवूडमधील आर्ची-परश्या