बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. मग याला सेलिब्रिटीही अपवाद नसतात. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात.व्यस्त शेड्युलमधून त्यांना जसा वेळ मिळेल ते त्यांचा छंद जोपासताना दिसतात. सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. यामध्येच छोटा पडदा गाजवणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो चाहत्यांचं लक्ष चांगलंच वेधत आहे.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका साऱ्यांनाच ठावूक असेल. विशेष म्हणजे या मालिकेविषयी फार काही सांगायची गरज नाही. मालिकेतील राणादा आणि अंजली बाई यांच्या उत्तम अभिनयामुळे आणि केमिस्ट्रीमुळे ही मालिका लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेत अंजलीबाई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरचा एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळेच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. अक्षया बऱ्याच वेळा इन्स्टाग्रामवर तिचे, तिच्या कुटुंबासोबतचे आणि मित्रपरिवारासोबतचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमध्ये तिने तिच्या बालपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Oho yes , this is me !

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

अक्षयाने शेअर केलेला फोटो तिच्या बालपणीचा असून यात ती अत्यंत गोड दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य चाहत्यांना मोहित करत असल्याचं या फोटोवरुन दिसून येत आहे. या फोटोत तिने छानसा एक फ्रॉक घातला आहे. हा फोटो शेअर करत, ‘अरे ही मीच’’ असं तिने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

साड़ी!

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on


दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतून राणादा आणि अंजलीबाई यांची निरागस प्रेम कहाणी उलगडली जात आहे. सध्या या मालिकेत राणादा आणि अंजली यांच्या जीवनात अनेक चढउतार येत आहेत. मात्र तरीही या दोघांनी एकमेकांची साथ सोडलेली नाही. त्यामुळे ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. टीआरपीमध्येही ही मालिका आघाडीवर असून या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशी, राणादा ही भूमिका वठवत आहे.