जगण्याचा वेग वाढलेला आहे पण भावनांची गती मात्र तेवढीच आहे. जगण्याचा हा वेग आणि भावनांचा आवेग यांच्यातील गमतीशीर तारांबळ म्हणजेच ‘What’s Up लग्न’ हा सिनेमा. भावना म्हटल्या की गाणी आलीच. मनातील भावना समोरच्यापर्यंत पोहचवण्यासाठी गाण्याइतकं सुंदर दुसर माध्यम नाही. मात्र चित्रपटाच्या कथानकाला साजेशी गाणी करताना ती तितकीच आशयघन तरीही सहज सोप्या शब्दात असली पाहिजेत. त्याला तितकेच तरल आणि उत्कट संगीतही लाभले पाहिजे. आणि हा सुंदर मेळ जमून आला आहे, ‘What’s Up लग्न’ या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये.

PHOTOS : एकाच दिवशी या तीन सेलिब्रिटी जोडप्यांचा विवाह

रोमॅण्टिक गाणी म्हटली की, रसिकांच्या मनात २ नावं सहज येतात – संगीतकार निलेश मोहरीर आणि गीतकार अश्विनी शेंडे. या सांगीतिक जोडीने कितीतरी सुंदर गाणी मराठी रसिकांना दिलीयेत. इतकी सुंदर रोमॅण्टिक गाणी दिल्यानंतरही, त्यांचे प्रत्येक नवीन गाणं तितकंच फ्रेश असणार यात रसिकांना कधीच शंका नसते. ‘What’s Up लग्न’ या चित्रपटासाठी सुद्धा या जोडीने ही किमया साधली आहे.

‘तू जराशी ये उराशी’ गाण्यातून वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे या जोडीने प्रेमामागाची उत्कटता आणि त्यातील भावनांची खोली याचा सुरेख मेळ साधला आहे. हनिमून हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं वळण असतं. एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम व्यक्त करणार हे गाणं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास गीतकार अश्विनी शेंडे व संगीतकार निलेश मोहरीर यांनी व्यक्त केला आहे.

PHOTO : अभिनेते जयवंत वाडकर यांची ‘ग्लॅमरस’ कन्या

वैभव आणि प्रार्थनाच्या केमिस्ट्रीमुळे तसेच गायक हृषीकेश रानडे आणि गायिका निहिरा जोशी यांच्या मधुर स्वरांनी या गाण्याची रंगत आणखीनच वाढवली आहे. ‘What’s Up लग्न’ चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी रसिकांना ९ फेब्रुवारी २०१८ पर्यत वाट पाहावी लागणार आहे.