अर्चना पूरण सिंह बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सध्या ती 'द कपिल शर्मा' शोमध्ये झळकताना दिसत आहे. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जागी आलेल्या अर्चनाने नुकताच एक मोठा खुलासा केला. तिने आपल्या खासगी आयुष्यातील एक आवाक् करणारा किस्सा सांगितला. View this post on Instagram My favourite place to be . the 'kursi' @kapilsharma #TKSS Wishing all the best to #marjaavaan team @riteishd @sidmalhotra @rakul.preet143 @tarasutaria #motichoorchaknachoor team @athiyashetty @nawazuddin._siddiqui on The Kapil Sharma Show tonight and tomorrow #thekapilsharmashow #lovemywork #shootlife #onsetlife EARRINGS: @the_jewel_gallery NECKLACE: @Azotiique A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh) on Nov 8, 2019 at 10:43pm PST काय आहे तो किस्सा? अर्चनाने सांगितले, एकदा तिला व तिच्या पतीला पोलिसांनी रात्री उशीरा कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडले होते. त्यावेळी रात्री जोरदार पाऊस पडत होता. अर्चनाला पावसात भिजायला खुप आवडते. त्यामुळे ती पती परमीत बरोबर भर पावसात लाँग ड्राईव्हवर गेली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोमान्स करताना पकडले. पोलिसांना पाहून अर्चना व परमीत खुप घाबरले होते. त्यांनी आम्ही पती पत्नी आहोत असेही सांगितले त्यानंतर त्यानंतर खुप विनवणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले. अर्चना म्हणाली, "आता हा किस्सा आठवून मला खुप हसू येते परंतु त्यावेळी मी खूप घाबरली होती. खरं तर हे खुप रिस्की होते. तेव्हापासून आम्ही रात्री उशीरापर्यंत बाहेर भटकणे टाळतो."