शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यात जोरदार ट्विटरवॉर रंगलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर मुलगी’ म्हणत तिच्यावर टीका केली. त्याला आता कंगनाने ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. असहिष्णूतेची चर्चा करणारे योद्धे आता कुठे गेले, असा सवाल तिने केला आहे.

‘२००८ मध्ये मूव्ही माफियाने मला वेडं ठरवलं, २०१६ मध्ये मला चेटकीण आणि दुसऱ्यांवर सतत लक्ष ठेवणारी म्हणाले. आता २०२० मध्ये एकाच्या हत्येनंतर मला मुंबईत सुरक्षित वाटत नाही असं म्हटल्यावर महाराष्ट्राचे मंत्री मला हरामखोर मुलगी म्हणतायत. असहिष्णूतेची चर्चा करणारे योद्धे आता कुठे गेले’, असा प्रश्न तिने उपस्थित केला.

आणखी वाचा : …तर मी कंगनाची माफी मागण्याचा विचार करेन- संजय राऊत

संजय राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी बॉलिवूड सेलिब्रिटींकडून होत आहे. अभिनेत्री दिया मिर्झा व दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर दुसरीकडे कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितल्यावर मी तिची माफी मागण्याबाबत विचार करेन अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.