करोना काळानंतर आता अनेक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक चित्रपटांच्या निर्मितीची घोषणाही करण्यात आली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री शहनाज गिलचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबतच त्याचा मेहुणा आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल हे देखील स्क्रीन शेअर करणार होते. पण मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांच्यासोबत चित्रपटाबाबत मतभेद झाले आहे. त्यामुळे त्या दोघांनाही या चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, कभी ईद कभी दिवाली’ बहुचर्चित चित्रपटाचे शूटींगला नुकतंच सुरुवात झाली. या चित्रपटातील अनेक दृश्य आयुष शर्माने शूट केले आहे. मात्र आता काहीतरी वाद झाल्याने त्याने या चित्रपटातून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान आणि आयुष यांच्यात काही मतभेद झाल्याचे बोललं जात आहे. या मुद्द्यावरुन वाद वाढल्यानंतर या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor aayush sharma quits salman khan kabhi eid kabhi diwali movie nrp
First published on: 23-05-2022 at 09:18 IST