अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांनी सत्तरच्या दशकात निवेदनाच्या माध्यमातून दूरदर्शनवरील ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा कार्यक्रम गाजवला होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या असतानाच त्यांनी चित्रपटात अभिनयास सुरुवात केली होती.

हेही वाचा >>> व्हीलचेअरवर बसून तबस्सूम शो होस्ट करत असतानाच आग लागली अन्…; अमिताभ बच्चन यांनी वाचवलेला जीव

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

९ नोव्हेंबर रोजी तबस्सूम यांची ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली होती. यामध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशी आणि कधी झाली, यावर भाष्य केले होते. “मी १९४७ मध्ये बेबी तबस्सूम म्हणून माझं करिअर सुरू केलं. तेव्हा मी तीन वर्षांची होते. माझ्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं नर्गिस. हिरॉइन होती नर्गिस आणि हिरो होते रेहमान. मी छोट्या नर्गिसचं काम करत होते. माझी मोठी आणि चांगली भूमिका होती. मी आजपर्यंत सहा माध्यमांमधून काम केलं आहे,” असं तबस्सूम यांनी तेव्हा सांगितले होते.

हेही वाचा >>> “निधनानंतर दोन दिवस…” तबस्सूम यांच्या शेवटच्या इच्छेबाबत मुलाचा खुलासा

“१९४५चं आकाशवाणीचं एक मासिक आहे, त्यात मुखपृष्ठावर तेव्हा माझं छायाचित्र प्रसिद्ध झालं होतं. मी तेव्हा ‘फुलवारी’ नावाचा लहान मुलांचा कार्यक्रम करत असे. १९४८ पासून मी ऑल इंडिया रेडिओवर रेडिओ जॉकी म्हणून काम केलेलं. माझे आईवडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते, पत्रकार होते. ते स्वत:चं मासिक काढत. अली सरदार जाफरी, कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी हे तेव्हा आमच्या मासिकात लिहीत. माझं लहानपण या लोकांच्या अंगाखांद्यावर गेलं,” अशी आठवण त्यांनी आपल्या या मुलाखतीत सांगितली होती.

दरम्यान, तबस्सूम यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. १९४७ साली बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्षे चालणाऱ्या दुरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सूत्रसंचलन केले होते. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’,’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले.

साप्ताहिक ‘लोकप्रभा’मध्ये तबस्सूम यांची प्रकाशित झालेली पूर्ण मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा