बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय त्याच्या ‘रनवे ३४’ (Runway 34) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अजय अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत सगळ्या गोष्टी सांभाळल्या आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अजयला सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला. अजयला मसाला ब्रॅंडवर अनेक मीम्स व्हायरल होतात. अनेकांना तर अजयने ही जाहिरात केल्याने अनेकांनी आक्षेप घेतला असा प्रश्न अजयला विचारण्यात आला. यावर अजय म्हणाला, “ही वैयक्तिक निवड आहे. जेव्हा तुम्ही जाहिरात करता, तेव्हा तुम्ही पाहता की त्याने होणारे नुकसान किती आहे. मी स्वत: साठी इतकचं बोलेन की मी वेलचीची जाहिरात करतो. मला मान्य आहे की प्रॉब्लम हा जाहिरातीत नाही, जर कोणती वस्तू इतकी वाईट आहे तर त्याची विक्री व्हायला नको.”

Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

आणखी वाचा : राजकुमार हिरानी आणि शाहरुख पहिल्यांदा येणार एकत्र, मजेदार व्हिडीओ शेअर करत केली ‘डंकी’ चित्रपटाची घोषणा

आणखी वाचा : RRR च्या यशानंतर Jr NTR ने घेतली हनुमान दीक्षा, राम चरण प्रमाणे करणार कठोर महाव्रत

दरम्यान, अजयच्या ‘रनवे ३४’ या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रकुल प्रीत (Rakul Preet Singh), बोमन ईरानी (Boman Irani) दिसणार आहेत. तर अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांनी ‘मेजर साब’, ‘खाकी’, ‘सत्याग्रह’, आणि ‘आग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. हे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आता या दोघांची मुख्य भूमिका असलेला ‘रनवे ३४’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह, बोमन ईरानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.