केरळमधील कोच्ची येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलाय. समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मिस केरळ २०१९ स्पर्धा जिंकणारी २५ वर्षीय अनसी काबीर आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी डॉ.अंजना शाहजान या दोघांचे निधन झाले आहे. दरम्यान, अनसीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर तिच्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे.

अनसीच्या आईने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिरावली आहे. त्या बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या घरात सापडल्या असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल

अनसीच्या निधनाची बातमी तिच्या नातेवाईकांना मिळाली. हे नातेवाईक तिच्या घराच्या जवळच रहायचे. त्यामुळे ते तिच्या आईला भेटायला आणि तिचे सांत्वन करण्यासाठी घरी गेले. त्यावेळी घराचे दरवाजे हे आतून बंद होते असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. मुलीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर जणू काही अनसीच्या आईला धक्का बसला आणि त्यांनी हा मोठा निर्णय घेतला.

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

अनसीने निधनाआधी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हालर झाली होती. दरम्यान, अनसी काबीर आणि डॉ.अंजना शाहजान या गाडी चालवत असताना, त्यांच्या समोर आलेल्या एका दुचाकीला चुकवण्याच्या नादात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत इतर दोन जणंही प्रवास करत होते. या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुवनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला. अचानक समोर आलेल्या दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये गाडीतील दोघी जागीच ठार झाल्या तर इतर दोघे गंभीर जखमी झालेत.