गायक अनु मलिक यांचा शायरी करण्याचा अंदाज तर सर्वांना माहीत आहे. त्यांच्या शायरी ऐकण्याचं सर्वच टाळताना दिसतात. ते जेव्हा शायरी करू लागतात तेव्हा सर्वच त्यांच्यापासून दूर पळताना दिसतात. पण एक वेळ अशीही होती की अनु मलिक यांच्या वागण्याला कंटाळून त्यांची पत्नी देखील त्यांच्यापासून दूर राहू लागली होती. नुकतंच सारेगमप रिअलिटी शोमध्ये अनु मलिक यांनी पत्नी अंजू यांच्या सोबतच्या डिनर डेटचा किस्सा शेअर केला.

अनु मलिक यांनी सांगितलेला हा किस्सा ९० च्या दशकातील आहे. जेव्हा अनु मलिक त्यांची पत्नी अंजू यांना घेऊन डिनर डेटला निघाले होते. तेव्हा अनु मलिक यांची पत्नी त्यांच्यासोबत चालण्याऐवजी त्यांच्या पासून दूर दूर राहत होती. अंजू या त्यावेळी अशा वागत होत्या जसं की त्या अनु मलिक यांना ओळखतच नाहीत.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

अनु मलिक यांनी नुकतीच सारेगमप रिअलिटी शोमध्ये खास पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी अनन्या चक्रवर्ती हिची हेअर स्टाइल पाहून अनु मलिक म्हणाले, ‘मी पण कधीकाळी अशाप्रकारे हेअरस्टाइल करत असे. मला आजही आठवतंय माझी पत्नी आणि मी एकदा डिनरसाठी बाहेर जात होतो. मी तिला सांगितलं होतं की, मी काऊबॉय हॅट आणि लेदर बूट्स घालून जाणार आहे. पण त्या हॅटमध्ये अशाचप्रकारच्या केसांच्या वेण्या घातलेल्या होत्या.’

अनु मलिक पुढे म्हणाले, ‘मी जेव्हा अशा प्रकारचे कपडे आणि स्टाइलमध्ये निघालो तेव्हा माझी पत्नी माझ्यापासून २० पावलं दूर चालू लागली. ती असं दाखवत होती की मला ओळखतच नाही. पण मी माझ्या कपड्यांसाठी आनंदी होतो आणि मला स्वतःवर विश्वास होता. मला खूप गंमत वाटत होती. जेव्हा मी अनन्याचा लुक अंजूला दाखवला तेव्हा तिला सर्व गोष्टी आठवल्या आणि ती हसू लागली.’

दरम्यान अनु मलिक आणि अंजू यांचं लग्न झालं तेव्हा ते दोघंही २१-२२ वर्षांचे होते. दोघंही पहिल्यांदा मिठीबाई कॉलेजमध्ये भेटले होते आणि तिथूनच दोघांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला होता.