बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अद्याप अविवाहीत आहे. आजवर संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, लुलिया वंतुर यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचे नाव जोडले गेले आहे. परंतु भाईजान आजही मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून मिरवतो. आता एका शोमध्ये अनिल कपूर यांना सलमान खानच्या लग्नाविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनिल कपूर यांनी नुकताच अरबाज खानच्या ‘पिंच २’ या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी अरबाजने अनिल कपूर यांना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी तसेच सोशल मीडियाशी संबंधीत अनेक प्रश्न विचारले. त्यावर अनिल कपूर यांनी मजेशीर अंदाजात उत्तर देखील दिले. दरम्यान अरबाजने विचारलेल्या एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि समांथा घेणार घटस्फोट? नागार्जुन म्हणाला…

अरबाजने अनिल कपूर यांना ‘सलमानचे लग्न कधी होणार?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत अनिल कपूर म्हणाले, ‘तू सलमानचा भाऊ आहेस. त्यामुळे तू मला या विषयी सांग. घरात याबाबत बोलणे तर होत असले ना?’ त्यावर उत्तर देत अरबाज खान म्हणतो, ‘त्याला सांगून सांगून कंटाळलो आम्ही.’ त्यानंतर अनिल कपूर यांनी उत्तर दिले. ‘यावर आमच्यामध्ये देखील चर्चा सुरु असते पण तो स्वत: काही बोलत नाही तर आम्ही कसे उत्तर देणार’ असे अनिल कपूर म्हणाले.

सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न सलमानच्या जवळील अभिनेत्यांना अनेकदा विचारला जातो. जवळपास प्रत्येक मुलाखतीत सलमानला देखील हा प्रश्न विचारला गेला आहे. पूर्वी तो कतरिनासोबत लग्न करणार असे म्हटले जात होते. परंतु अशाच चर्चा आता लुलीया वंतुरच्या बाबतीतही सुरु आहे. लुलीया एक रोमानियन अभिनेत्री आहे. ‘फ्रेमा’ आणि ‘डान्सेस पेत्रू टिने’ या दोन रिअॅलिटी शोमध्ये तिने काम केले आहे. ती एक उत्तम डान्सरदेखील आहे.