बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेता अर्जुन कपूरने सावत्र बहिणी जान्हवी आणि खूशी कपूर यांना पाठिंबा दिला. तो नेहमी जान्हवी आणि खूशीची काळजी करताना दिसतो. बऱ्यावेळा सोशल मीडियावर त्या दोघींना ट्रोल करणाऱ्यांना देखील अर्जुन सडेतोड उत्तर देतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुनने सावत्र बहिण जान्हवी कपूरसोबत असेल्या नात्यावर वक्तव्य केले आहे.

अर्जुन आणि जान्हवीने एका मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यान त्यांच्यातील बॉंडिंग पाहून चर्चा रंगल्या होत्या. वेळेनुसार त्यांच्या नात्यात देखील बदल झाले आहेत असे अर्जुन म्हणाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

‘पहिले आम्ही भेटायचो पण कधीही एकमेकांशी बोललो नव्हतो. आम्ही शांत बसलेले असायचो. आम्ही एक आनंदी आणि एकत्र कुटुंब आहोत असं म्हटलं तर चुकीचे ठरेल. आम्ही आजही वेगवेगळे कुटुंब आहोत आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो’ असे अर्जुन म्हणाला.

पुढे जान्हवी म्हणाली, ‘मी माझ्या कुटुंबाकडून बरेच काही शिकले आहे. आमचे वडील एकच आहेत. आमच्या अंगात एकच रक्त आहे आणि ते कुणी बदलू शकत नाही. भाऊ अर्जुन आणि अंशुला दिदी यांच्यासोबत असल्यावर मला कम्फर्टेबल वाटते. रोज सकाळी जेव्हा मी उठते तेव्हा मला या दोघांचा पाठिंबा आहे असा विचार माझ्या डोक्यात सुरु असतो.’