अमिताभ बच्चन यांनी बुधवारी त्यांचा मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला आज नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. हा क्षण आनंदाचा आणि सुखाचा असल्याचे अमिताभ यांनी शुभेच्छा देताना म्हटले.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे २० एप्रिल २००७ रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. यानंतर नोव्हेंबर २०११मध्ये त्यांच्या मुलीचा आराध्याचा जन्म झाला होता.
उद्याचा दिवस उगवेल तेव्हा तुमच्या नात्याला नऊ वर्षे पूर्ण होतील. हा आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि सुखाचा क्षण असेल, कारण या दिवशी विवाहबंधनात फक्त तुम्ही दोघेच नव्हे तर आम्ही मोठी मंडळीही बांधली गेलो. तो क्षण म्हणजे कुटुंबांनी एकत्र येण्याचा आणि प्रेमाचा व एकोप्याचा होता, असे अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहले आहे.