छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यंदाच्या स्पर्धकांवर काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला नाराज आहे. केवळ सिद्धार्थ शुक्ला आणि निकी तांबोळी दोघंच मिळून शो चालवत आहेत का? असा सवाल तिने शोच्या निर्मात्यांना केला आहे.

अवश्य पाहा – पहिल्याच आठवड्यात ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस’मधून बाहेर

“गेल्या १३ वर्षांच्या तुलनेत १४ व्या सीझनमधील स्पर्धक काहीसे कंटाळवाणे आहेत. असं वाटतंय की सिद्धार्थ शुक्ला आणि निकी तांबोळी दोघंच मिळून हा शो चालवतायेत.” अशा आशयाचं ट्विट करुन शेफालीने बिग बॉसच्या १४ व्या सीझनबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकरी आंदोलन : कंगनाला ते ट्विट करणं पडलं भारी; कर्नाटक पोलिसांनी दाखल केला गुन्हा

यापूर्वी काम्या पंजाबी हिने देखील यंदाच्या बिग बॉस स्पर्धकांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. “मला हे सर्वच कलाकार खुप कंटाळवाणे वाटतायेत. कलर्स वाहिनीने काहीतरी करावं. ही मंडळी रोज एकाच मुद्द्यावर भांडतात. या शोमध्ये आता कुठल्याही प्रकारचं मनोरंजन दिसत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने बिग बॉस स्पर्धकांवर टीका केली होती. लक्षवेधी बाब म्हणजे या दोन्ही अभिनेत्री बिग बॉसच्या माजी स्पर्धक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची ही ट्विट्स सध्या ‘बिग बॉस’ चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.