बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरामध्ये “संयमाची ऐशी तैशी” हे साप्ताहिक कार्य आज रंगणार आहे. या कार्यामध्ये कोणाचा संयम तुटणार? कोण संयमाला धरून चालणार? हे पाहायला मिळणार आहे. दरम्यान, टास्कमध्ये गायत्री आणि विकास तृप्तीताईंना खडेबोल सुनावणार आहेत.
 
टास्कमध्ये गायत्री म्हणाली, “तृप्तीताईंना तर काहीच नाही करता येत नाही. नुसतं सगळं कॅमेरासाठी करायचं आहे.” त्यावर उत्तर देत तृप्तीताई म्हणाल्या, “तुम्ही म्हणाल तसं.” पुढे गायत्री म्हणाली, “आम्ही राक्षस नाही तुम्ही राक्षस आहात खरंतर तर. एक साधा महामेरू बांधता येत नाही, या कसल्या देवदूत? बांधता पण येत नाही नीट हो ना? पण फक्त खोटं बोलतात तृप्तीताई. त्या नाही या टीमकडून नाही त्या टीमकडून बरोबर ना?” टास्कमध्ये गायत्री आणि विकास तृप्तीताईंना ऐकवताना दिसतात.
आणखी वाचा : ‘तुम्हारी कंट्री का कौतुक है’, झिम्मा चित्रपटाचे भन्नाट शिर्षक गीत प्रदर्शित

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना आता विकास, तृप्तीताई आणि गायत्री यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळणार आहे. विकास आणि गायत्रीच्या या बोलण्यावर तृप्तीताई संयम दाखवतील की उत्तर देतील हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.