आलिया भट्ट आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे, नुकताच तिने मुलीला जन्म दिला आहे. आपल्या कारकिर्दीत तिने अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यावर्षी तिचा 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांपासून ते चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 'मिर्झापूर' अभिनेता विजय वर्माने एका मुलाखतीत आलिया भट्टचे कौतुक केले आहे. फिल्म कम्पॅनियन या कार्यक्रमात विजय वर्मा, अनिल कपूर, शीबा चड्ढा, आयुष्मान खुराना, रिषभ शेट्टी, जान्हवी कपूर, वरुण धवन, दुलकर सलमान, राजकुमार राव आणि विद्या बालन असे कलाकार उपस्थित होते. तेव्हा विजय असं म्हणाला, "अनिल कपूर आणि माझी पहिली भेट 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला झाली, मी स्क्रीनिंग दरम्यान बाथरूमला गेलो असताना अनिल कपूर तिथे आले तेव्हा आम्ही आलिया भट्ट आणि तिच्या चित्रपटाबद्दल चर्चा केली, चित्रपट उत्तम चालला आहे आलियाने चांगले काम केले आहे, असे आमच्यात संभाषण झाले." ‘गली बॉय’चित्रपटातून पुढे आलेला विजय वर्मा याची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गली बॉय’मध्ये रणवीरपेक्षा जास्त कौतुक विजयचं झालं, तो नुकताच आलिया भट्ट आणि शेफाली शहा यांच्याबरोबर नेटफ्लिक्सच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात झळकला. यातील विजयच्या कामाची खूप प्रशंसा झाली. आता विजय करीना कपूर आणि जयदीप अहलावत यांच्याबरोबर सुजॉय घोष यांच्या एका चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटातून करीना कपूर प्रथमच ओटीटीविश्वात पदार्पण करणार आहे.