बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्नाचा आज ४८वा वाढदिवस आहे. ‘दिल चाहता है’, ‘ताल’, ‘हंगामा’, ‘मेरे बाप पहले आप’, ‘रेस’ यांसारख्या चित्रपटातून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम २’ या अजय देवगणच्या चित्रपटात अक्षय महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. परंतु, अक्षय काही काळ मनोरंजनविश्वापासून दूर होता.

मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अक्षय खन्नाला वयाच्या १९-२० वर्षातच केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. यामुळे त्याने आत्मविश्वासही गमावला होता. २००७ साली ‘कॉफी विथ करण’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्नाने याबाबत खुलासा केला होता. “१९-२०व्या वर्षीच मला केसगळतीची समस्या जाणवू लागली होती. एवढ्या कमी वयात टक्कल पडत असल्यामुळे मी माझा आत्मविश्वा गमावून बसलो होतो. एखाद्या पियानो वादकाला त्याची बोट कापल्यावर जशा वेदना होतील, तशा मला होत होत्या”, असं अक्षय म्हणाला होता.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
sharad pawar health in loksabha
वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार ‘अशी’ घेतात आपल्या आरोग्याची काळजी
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

हेही वाचा>> “…म्हणून मी लग्न केलं नाही”; अभिनेता अक्षय खन्ना सांगितलं अविवाहित राहण्यामागचं कारण

“नंतर याकडे मी लक्ष देणं सोडून दिलं. हे खरंच खूप चिंता वाढवणारं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमधील महत्त्वाची दोन वर्षे गमावू शकता. सुंदर दिसणं एका अभिनेत्यासाठी महत्त्वाचं असतं. यामुळे मी निराश झालो होतो. ही भावना तुम्हाला अधिक कमजोर करते. टक्कल पडल्यामुळे मी तारुण्यातच माझा आत्मविश्वास गमावून बसलो. या गोष्टीचा माझ्यावर खूप जास्त परिणाम झाला होता”, असंही अक्षय खन्नाने सांगितलं होतं.

हेही वाचा>> हनिमूनसाठी गेलेल्या टीव्ही अभिनेत्रीने खाल्ली तब्बल १८०० रुपयांची मॅगी, पती फोटो शेअर करत म्हणाला…

अक्षय खन्ना हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. ‘हिमालय पुत्र’ या सिनेमातून अक्षयने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती. त्यानंतर केसगळतीच्या समस्येमुळे त्यांनी करिअरमधून दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. २००१ साली ‘दिल चाहता है’ चित्रपटातून त्याने पुन्हा कमबॅक केलं. २०१२ साली अक्षयने पुन्हा चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. २०१६ साली ‘ढिशूम’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.