आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे त्यांना कन्यारत्न झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांनी एकत्र साजरे केलेल्या सणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २०२२ वर्ष खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी लकी ठरले आहे. मागच्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि त्यांनी एका मुलीला जन्मदेखील दिला आहे. ‘राहा असं मुलीचे नाव ठेवले असून तिच्या आगमनाने कपूर कुटुंबिय सध्या खुश आहेत.

आलिया आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. तसंच त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करतेय हे चाहत्यांशी शेअर करत असते. मात्र ती आता काम करणार नाही अशी चर्चा असताना इटाईम्सशी बोलताना तिने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ती असं म्हणाली, “होय, माझ्या करिअरच्या शिखरावर असताना मी लग्न करून मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या कामात लग्न किंवा मातृत्व काहीही बदलेल असं कोण म्हणतं? असे जरी झाले मला त्याची पर्वा नाही. मला माहित होते की आयुष्यात मला मूल होण्याच्या निर्णयाचा कधीही पश्चाताप होणार नाही. ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय आहे.” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

“नव्या वर्षाची सुरवात ‘पठाण’बरोबर…” शाहरुख खानने २०२३च्या शुभेच्छा देत चाहत्यांना केले आवाहन

आलियाच्या गरोदरपणात ती बाळाच्या जन्मानंतर वर्षभर तरी काम करणार नाही, ती वर्षभर कामापासून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आलियाने वेगळाच विचार केला आहे. राहाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतरच ती नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

आलिया फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होती. गरोदरपणा नंतर ते थेट याच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असंही बोललं गेलं. मात्र आता ती फरहान अख्तर च्या नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.