रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे निर्माता- दिग्दर्शक यश चोप्रा श्रीनगरमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह आगामी चित्रपट ‘सिलसिला’बाबत चर्चा करत होते. ज्यात अभिनेत्री स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांना घ्यावं असं ठरलं होतं. शूटिंग काही दिवसांतच सुरू होणार होतं आणि अचानक एक दिवस अमिताभ यांनी यश चोप्रा यांना विचारलं तुम्ही या कास्टिंगबद्दल आनंदी आहात का? सुरुवातीला तर यश चोप्रा शांत राहिले पण अमिताभ यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी म्हटलं, “खरं तर मला जया आणि रेखा यांना या चित्रपटात कास्ट करण्याची इच्छा होती.” यावर अमिताभ यांनी जया आणि रेखा तयार असतील तर त्यांना काहीच समस्या नाही असं उत्तर दिलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यश चोप्रा यांनी २०१२ मध्ये शाहरुख खानला दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. यश चोप्रा म्हणाले होते, “मी कधीच विचार केला नव्हता की अमिताभ, जया आणि रेखा एका अशा चित्रपटात काम करतील जो त्यांच्या खऱ्या आयुष्याशी मिळता- जुळता आहे.” यश चोप्रा यांना आनंद होणं स्वाभाविक होतं कारण त्यावेळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीचे किस्से बरेच चर्चेत होते. अमिताभ आणि जया यांचं लग्न झालं होतं आणि अमिताभ त्यावेळी देशातल्या सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक होते. त्या काळात मासिकांमध्ये रेखा आणि त्यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा छापल्या जात होत्या. पण या दोघांमध्ये खरंच प्रेम होतं की फक्त या केवळ अफवा होत्या आणि मासिकांचे मसालेदार मथळे? अर्थात यावर या दोघांनीही थेट भाष्य कधीच केलं नाही.

आणखी वाचा- KBC 16 : तुम्ही एकदा परिधान केलेले कपडे परत वापरत नाही का? अमिताभ बच्चन म्हणाले, “मी ते…”

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय बोलल्या होत्या रेखा?

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात नेमकं काय नातं होतं? याचा खुलासा ना कधी अमिताभ यांनी केला ना रेखा यावर काही बोलल्या. पण टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी एका मुलाखतीत रेखा यांना, “तुम्ही कधी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम केलं आहे का?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर रेखा लगेच उत्तरल्या, “अर्थातच केलं. पण हा तर खूप सोप्पा प्रश्न आहे कारण मला आजपर्यंत असा एखादा पुरुष, महिला किंवा मुलंही नाही भेटलीत ज्यांचं अमिताभ यांच्यावर प्रेम नाही. मग हा प्रश्न मलाच का? मी याला नकार देईन असं वाटतं का?” याच मुलाखतीत स्पष्टीकरण देताना रेखा पुढे म्हणाल्या होत्या, “अमिताभ यांच्यासह माझे कोणतेही व्यक्तीगत संबंध किंवा नातं नव्हतं आणि हेच सत्य आहे. वाद आणि अफवा यात कोणतंच सत्य नाही.”

जेव्हा रेखा यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याने भडकले होते अमिताभ बच्चन

प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांनी त्यांच्या पुस्तकात अमिताभ बच्चन यांच्यासह केलेल्या एका मुलाखतीचा किस्सा सांगितला होता. कशाप्रकारे रेखा यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर अमिताभ बच्चन भडकले होते हे त्यांनी सांगितलं होतं. करण थापर यांनी लिहिलंय, “मी एकदा अमिताभ यांची मुलाखत घेत होतो. अमिताभ बच्चन मला सर्व प्रश्नांची उत्तरं देत होते अशावेळी मला वाटलं की रेखा यांच्यासंबंधी प्रश्न विचारल्यावर ते चिडणार नाही. त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी संयम ठेवून प्रश्नाचं उत्तर दिलं मात्र मुलाखत संपल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसत होता आणि त्यानंतर जेवणाच्या टेबलवर पूर्ण शांतता पसरली होती.”

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्या नातीने महिलांच्या मासिक पाळीबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘माझ्या घरात…’

दरम्यान रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘सुहाग’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘राम बलराम’, ‘खून पसीना’ हे त्यांचे चित्रपट बरेच गाजले. पण विशेष म्हणजे सिलसिला हा त्यांनी एकत्र काम केलेला अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. आजही कोणत्याही पार्टीमध्ये एकत्र दिसणं दोघंही टाळतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan know about his relationship with rekha mrj
First published on: 08-10-2022 at 09:28 IST